मला देवाचे दर्शन घेऊ द्या - चिंतन आणि रसग्रहण


(जातीजातीमधील भेद जरी नष्ट होत गेला असेल तरी समाजात अजूनही भेद आहे. हे मात्र लक्षात घेतले पाहिजे. सावरकरांनी या भेदावर आसूड ओढलंय. पण ते आसुड ओढताना सावरकर हिंदु समाजाच्या आईच्या भूमिकेत होते मित्रांनो )





अनेक समाज सुधारकांप्रमाणे स्वा. सावरकरांनी अस्पृश्य प्रथेच्या विरोधात लढा दिले. सावरकर हिंदुत्ववादी होते आणि ब्राह्मण होते म्हणून त्यांच्याकडे भारतातीय स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणार्‍या लोकांनी त्यांचे कार्य नाकारले व त्यांच्यावर गलिच्छ टिका केली. सावरकरांचे सबंध साहित्य आज उपलब्ध आहे. सावरकर हे एक महापुरुष आहेत ज्यांना मानणारे अनेक वैचारिक वर्ग आहेत. स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारे लोक सावरकरांना नास्तिक मानतात आणि आपली नास्तिकता किती योग्य आहे हे दाखवण्यासाठी सावरकरांची उदाहरणे देतात. पु.ल. देशपांडेंसारख्या थोर साहित्यिकालाही सावरकरांच्या या विचारांनी भुरळ घातली. त्यांनाही सावरकर नास्तिक वाटतात. राजकीय नेते शरद पवार सुद्धा सावरकरांनी गाईला देव मानले नसून उपयुक्त पशू मानले आहे असे आवर्जून सांगतात. एरव्ही सावरकर विचार गुंडाळून ठेवलंत असले तरी हे मात्र त्यांना पटतं. तुम्ही सबंध सावरकर चरित्राचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की या सर्वांपेक्षा सावरकर खुप पुढे गेले आहेत. हा सर्व अट्टाहास हिंदुंचे संघटन करण्यासाठी होता. हिंदुंवर टिका करुन मजा घेण्यासाठी नव्हता. हे मात्र कुणी लक्षात घेत नाही. त्यांनी नास्तिक, गाय ही उपयुक्त पशू आहे या पलीकडे सावरकर गेले आहेत. सावरकर हे अध्यात्मिक पुरुष होते असंही त्यांना जवळून ओळखणार्‍यांचं म्हणणं आहे. 'ॐ, स्वास्तिक, कुंडलिनी, कृपाण, आणि भगवा रंग असलेला चिन्हांकीत पताका हिंदुराष्ट्राचा ध्वज सावरकरांच्या सुचनेनुसार अखिल भारतील हिंदुमहासभेने १९३६ मध्ये स्वीकारला. ही चिन्हे हिंदु धर्माचे प्रतीक असले तरी ही अध्यात्मिक चिन्हे आहेत.

ते योगसाधना करायचे, बारीची मुलगी जेव्हा सावरकरांना अंदमानच्या कोठडीत भेटायला आली तेव्हा तिने असा उल्लेख करुन ठेवला आहे की जेव्हा बारीची मुलगी तुरुंगातून जात होती तेव्हा तिला पाहायला अनेक कैदी आसुसलेले होते. ती अतिशय गोरीपान व सुंदर सोळा वर्षांची नवतरुणी, तिला सावरकरांना ठेवलेल्या कोठडीपाशी आणण्यात आलं तेव्हा सावरकर ध्यान करीत बसले होते. बारीची मुलगी लिहिते की सावरकर एखाद्या भारतीय योग्यासारखे दिसत होते. पुढे पुढे लिहिते की त्या दिव्य पुरषाला पाहून माझे वीर्यस्खलन झाले. अशा प्रकारचा उल्लेख प्रदीप दळवी ह्यांनी त्यांच्या त्रिनेत्र या कादंबरीत केलेला आहे. सावरकरांनी अस्पृश्यांना न्याय मिळावा म्हणून जीवाने रान केले. स्वतःवर अन्याय झालेला असताना पेटून उठणे आणि स्वतःवर काहीएक अन्याय न होता त्यासाठी झटणे यात फरक आहे. तुलना करायची नाही. परंतु यामुळे विषय समजून घेता येईल. आपण शाहू फुले आंबेडकरांची नावे घेतो, ते त्यांनी रंजल्या गांजल्यांसाठी कार्य केले म्हणून. तेच कार्य कार्य सावरकरांनी केले तर ते टाकाऊ ठरते. हा पुरोगाम्यांचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यापासून रोखले गेले हा पुरोगामी महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. निखिल वागळे हे अनेक पुरोगामी लोकांचे आदर्श पत्रकार आहेत. ते मुख्यमंत्र्याचा उल्लेख पेशवाई असा करतात. हा पुरोगामी महाराष्ट्रचा खरा चेहरा आहे. 

सावरकरांनी अनेक गीत लिहिले. आपली चळवळ त्यांनी साहित्यातून उतरवली आहे. हिंदूंचे संघटन करायचे असेल तर हिंदुंमधील जातीभेद नष्ट झाला पाहिजे. आपल्याच एका समाजावर अन्याय होताना पाहून सावरकर तळतळतात. त्यांनी रत्नागिरीत अस्पृश्य निवारणाचे जे कार्य केले आहे ते अतुलनीय आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ब्राह्मण जातीत जन्म घेऊन खुपच मोठी चुक केली. ते ब्राह्मणेत्तर समाजाचे असते तर कदाचित त्यांचे योगदान आपण नाकारले नसते. रत्नागिरीत असताना अस्पृश्यांच्या दृष्टीकोनातून त्यांनी एक सुंदर गीत लिहिले, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. स्वच्छता कर्मी असलेल्या समाजाचे दुःख मांडणारे हे गीत. सावरकर लिहितात,
 
मला देवाचे दर्शन घेउ द्या
डोळे भरून देवास मला पाहुं द्या II धृ II

त्या काळी या समाजाला देवळात येण्याची बंदी होती. ही बंदी केवळ ब्राह्मणांनी घातली नव्हती तर सर्व समाजाने घातली होती. हा करंटेपण आपण केला होता हे सत्य आहे. आपण हिंदू सहिष्णू आहोत असे म्हणत असतो. पण आपण शत्रूंच्या बाबतीत सहिष्णू होतो. मात्र आपल्याच बांधवांप्रति आपण असहिष्णूता दाखवली आहे हे सत्य नाकारण्याचे कारण नाही. इस्लामचे अभ्यासक इस्लाममध्ये काय काय सांगतले लिहिले आहे याबद्दल सांगत असतात. पण इस्लामच्या पाईकांनी जगात जो अनन्वित छळ केला त्याबद्दल त्यांना बोलावेसे सुद्धा वाटत नाही. एखाद्या मौलविला सबंध मुस्लिम आतंकवाद्यांच्या विरोधात ते मुस्लिम नाहीत असा फतवाही काढावासा वाटत नाही. आजही ईस्लामचे पाईक, म्हणजे स्वतःला इस्लामवादी म्हणवून घेणारे व पंथासाठी हिंसा करणारे असे लोक आहेत. आतंकवादी संघटन आहे, तरी सुद्धा ह्याम्चे डोळे उघडत नाही. पण हिंदुंनी हा करंटेपणा आतातरी करायला नको. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचे पातक आपल्या डोक्यावर आहे. हे आपण स्वीकारले पाहिजे. अशा परिस्थितीत सावरकर गीत लिहितात. मला देवाचे दर्शन घेउ द्या, डोळे भरून देवास मला पाहुं द्या... ते पुढे लिहितात,
 
जो तुम्हिच करा दिनरात
मळ काढित मळले हात
म्हणुनीच विमल हृदयात
हृदय त्या वाहु द्या.

आम्ही तुम्हाला अस्पृश्य वाटतो? का? तर तुम्ही जो मळ निर्माण करता, तुम्ही शौच करता, तुम्ही कचरा निर्माण करता. ते शौच, तो कचरा आम्ही आमच्या निर्मळ खांद्यावरुन घेऊन जातो म्हणून आमचे खांदे, आमचे हात मलीन होतात. हा जो मळ दिसतोय हा तुमचाच तर आहे हिंदुबंधूंनो. हा मळ जर आम्ही स्वच्छ केला नाही तर रोगराई पसरेल आणि तुम्ही आजारी पडाल. मळ तुम्ही निर्माण करता, आम्ही तो स्वच्छ करतो. मग मला सांगा अस्पृश्य कोन आहेत? बंधूंनो तुम्हाला आमचे मळलेले, गलिच्छ हात दिसतात. पण आमचे मन निर्मळ आहे हो. आम्हाला फूल म्हणून आमचे ह्रदय कमळ देवाला अर्पण करु द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या.  

मी तहान जल तो जाण
मी कुडि माझा तो प्राण
मी भक्त नि तो भगवान
चरण त्याचे शिवु द्या.

मी तहान आहे आणि भगवंत जणून माझे जल, पाणी. तहानलेल्या माणसाला पाण्यापासून बळजबरी दूर ठेवणे हे पाप आहे बंधूंनो. एकनाथ महाराज तर तहानलेल्या गाढवाला सुद्धा पाणी पाजतात. गाढव सुद्धा प्राण्यांमधला अस्पृश्य नव्हे का? तो माल वहन करण्याचे कार्य करतो. जर गाढवाला इतका मान आहे बंधूंनो मग आम्ही तर तुमच्यासारखी माणसे आहोत. मित्रांनो म्हणून सांगतो तहानलेल्या माणसाला पाण्यापासून दूर ठेवू नका. मी कुडी माझा तो प्राण... म्हणजे देह... मी देह आहे आणि तो भगवंत माझा प्राण आहे. देहातून प्राण काढून टाकलात तर तो देह निष्काम होतो, जाळण्यावाचून कोणतीच क्रिया त्या देहावर हो शकत नाही. म्हणूनच बंधूंनो, माझा प्राण मला परत द्या... माझा भगवंत मला द्या.. मी भक्त आहे, तो भगवान आहे. मला एकदा त्याच्या चरणाला स्पर्श करु द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या.

तो हिंदु-देव मी हिंदु
मी दीन तो दया-सिंधू
तुम्ही माझे धर्माचे बंधू.
अडवु नका जाउ द्या
मला देवाचे दर्शन घेउ द्या...

त्याच्यात आणि माझ्यात काय अंतर आहे. माझा देव हिंदु आहे आणि मीही हिंदु आहे. मी दीन आहे, दुःख आहे... का? तर माझ्या भगवंताला मी पाहू सुद्धा शकत नाही? का? तर माझा अपराध केवळ एवढाच की तुम्ही निर्माण केलेली घाण मी स्वच्छ करतो. तो हिंदु देव, मी हिंदु, तुम्ही सुद्धा माझ्याच धर्माचे हिंदु बांधव आहात ना? मग का अडवता? नका अडवू, मला जाऊ द्या. माझ्या देवाचे दर्शन घेऊ द्या...

सावरकरांची ही कविता वाचताना हलकेच डोळ्यांत अश्रू तरळतात. हिंदु समाजाने बर्‍यापैकी भेदभाव बंद केले आहेत. जिथे जिथे हे भेदभाव होता तिथेही ते बंद झाले पाहिजे. पण लक्षात घ्या. आजच्या कॉर्पोरेटच्या जगात सुद्धा हा भेदभाव होतो. मोठमोठ्या कार्यालयात. मॅनेजर किंवा मालक त्यांच्या ऑफिसमध्ये शौचालय स्वच्छ करणार्‍या माणसासोबत कधीच जेवायला बसत नाही. तेथे तर जातीभेद नाही ना? मग हा कसला भेद आहे? हा भेद आहे पदाचा. इथे सुद्धा अहंकार आहेच, मग हा सुद्धा एकप्रकारची जातीभेद नव्हे का? सबंध जगामध्ये जाती आहेतच. त्या जातींना केवळ जाती म्हणत नाही इतकेच. हिंदुंमध्ये केवळ जाती व्यवस्था आहे. कास्ट मॅनेजमेंट. ही जातीव्यवस्था काहीतरी चांगलं करण्यासाठी निर्माण झाली असावी. पण काही काळानंतर ही व्यवस्था बोचायला लागली. जशी मॅनेजरच्या मनात आपल्या ऑफिसमध्ये शौचालय स्वच्छ करणार्‍या कामगाबद्दल तुच्छता निर्माण झाली, तशीच स्वतःला उच्च जातीचा समजणार्‍या समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. पण त्याच बरोबर स्वतःबद्दल हीनभाव बाळगणार्‍या अस्पृश्यता लादलेल्या समाजातही निर्माण झाली. मुकेश अंबानी आपल्या मुलीचं लग्न त्याच्या शिपायाच्या मुलीशी करवून देईल का कधी? हिंदुंमध्ये जो भेद होता तो अशाच प्रकारचा होता. जातीजातीमधील भेद जरी नष्ट होत गेला असेल तरी समाजात अजूनही भेद आहे. हे मात्र लक्षात घेतले पाहिजे. सावरकरांनी या भेदावर आसूड ओढलंय. पण ते आसुड ओढताना सावरकर हिंदु समाजाच्या आईच्या भूमिकेत होते मित्रांनो. समाजात कार्य करायचे असेल तर फेसबुकवर केवळ टिंगल टवाळी करणार्‍यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि काही शिघ्रकोपी हिंदुंच्या कृत्याला समोर ठेवून हिंदुत्ववाद्यांना दुषणे देणार्‍यांनी आणि हिंदुत्ववादी जणू आतंकवादी आहे असा भास निर्माण करणार्‍यांनी व स्वतःस हिंदुहितवादी म्हणवून घेणार्‍यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. हिंदुत्ववाद्यांनी या देशासाठी बलीदान दिले आहे, टिळक, सावरकर अशा महापुरुषांनी प्रचंड मोठे कार्य करुन ठेवले आहे. ते हिंदुत्ववादी होते. ज्याप्रामणे कॉंग्रेसला चाणक्य ते शिवाजी महारांपर्यंत चालत आलेली परंपरा नष्ट करुन हिंदी राष्ट्रवाद निर्माण करायचा होता. त्याप्रमाणे स्वतःस हिंदुहितवादी म्हणवून घेणारी मंडळी हिंदुत्ववाद्यांना बदनाम करुन टिळ्क व सावरकरांची परंपरा जी परंपरा राम-कृष्ण-चाण्यक्यांपासून सुरु आहे ती परंपरा त्यांना बंद पाडायची आहे. हे लोक केवळ विशिष्ट बौद्धिक समजल्या जाणार्‍या लोकांमध्ये प्रसिद्ध असतात. त्यांना सर्वसामान्यांची मने कळ नाही आणि सर्वसामान्यांमध्ये ते जात सुद्धा नाही. एका विशिष्ट गुडीगुडी वातावरणात राहून ते लोकांना डोस पाजत असतात. तुम्ही हिंदुत्ववादी राहूनही हिंदुहिताचे कार्य करु शकता मित्रांनो. असे पळून जाऊन, आम्ही नाही त्यातले असे म्हणून काही होणार नाही. सावरकरांनी आपल्या पूर्वजांचे पाप धुण्याचे काम केले आहे. ते करीत असताना त्यांनी स्वतःला वेगळी विशेषणे लावून घेतलेली नाहीत. सावरकरांनी हिंदुत्व हा सुंदर ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथात सर्वसमाजाचे हित आहे, जगाचे हित आहे. ते हिंदुत्व करंटे कसे असू शकते, त्या हिंदुत्वाची परंपरा पुढे चालवणारे हिंदुत्ववादी करंटे कसे असू शकतात? त्यामुळे जातीभेद नष्ट होत असताना हिंदूंमध्ये इतर कोणतेही भेद होणार नाही याची काळजी आपण हिंदुंनीच घेतलेली बरी... 
तुम्ही आम्ही सकल हिन्दू बंधू बंधू , तो महादेव ची पिता आपला चला तया वंदु...

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
9967796254
Share:

Related Posts:

1 comment:

  1. अतिशय समर्पक असा लेख...!!👌👌

    ReplyDelete

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

82285

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)