महाराष्ट्रभरातून हि पद्मावती चित्रपटाला विरोध कायम.....!



   

जगातील प्रत्येक राष्ट्र हे त्याच्या प्रति निष्ठावान व्यक्तींनी केलेल्या सर्वस्वाच्या बलिदानानेच चिरंजीवी ठरते. अनेकवेळा त्यामागे असलेली प्रेरणा ही भूमी/मातृभूमी असते. परंतु हिंदुस्थान असे राष्ट्र आहे जिथे चारित्र्याच्या बाबतीत ही तेवढीच सजगता दिसते.हिंदुस्थान हा असंख्य प्राणांच्या बलिदानाने रक्ताने पावन झालेला देश.अश्या या देशात हिंदु संस्कृती आणि पावित्र्य राखण्यासाठि आपले चारित्र्य अबाधित राखण्यासाठि अनेक शुर वीरांनी प्राणांची आहुती दिली. यामध्ये फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रीयांनी हि आपला जीव पनाला लावुन हिंदुस्थान चे चरित्र हनन होण्यापासुन वाचवले.त्यातलेच एक प्रखर उदाहरण म्हणजे चितोडची राणी पद्मावती. आपल्या १४००० राजपूत माता भगिनींना सोबत घेऊन खिलजी सारख्या स्त्रीलंपट क्रुर इस्लामी आक्रमकाच्या अधिन न जाता जोहार करुन अग्निप्रवेश करुन प्राण त्यागला.राणी पद्मावती हि स्त्रीचेच नव्हे तर हिंदु रणरागिणीचे प्रतिक आहे. जिच्या बलिदानाने राजपुतांची पगडी मानाने त्यांच्या मस्तकावर आहे असे म्हणने गैर ठरणार नाहि.परंतु नेहमी प्रमाणे गोवारिकर नंतर हिंदुची मान खालावेल असे लागोलाग कृत्य केले ते भन्साळी नामक दिग्दर्शाने. खिलजी सारख्या स्त्रीलंपट क्रुर नंपुसकाला राणी पद्मावती सोबत दाखवलेल्या प्रेम संबधांमुळे समस्त हिंदुस्थानमध्ये सध्या असंतोष माजला आहे. ह्या असंतोषाचे वणव्यात रुपांतर झाले आहे.राणीच्या सन्माना करिता भारतात जागोजागी कारणीसेनेला पाठिंबा देत अनेक हिंदुत्ववादि संस्था पुढे सरसावत आहेत.असे असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी महाराष्ट्रातील समस्त धारकर्यांना आदेश दिला कि, जागोजागी या विरोधात मोर्चे काढा. महाराष्ट्रात कुठे हि हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका त्यासाठि आपल्या प्रातांतील वा राज्यातील चित्रपटगृहाला तसेच प्रांताधिकारी,तहसिलदार आणि पोलिस अधिकारी यांना  निवेदन द्या. २ डिसेंबर रोजी सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकर्यांनी या विरोधात मोर्चा काढुन संजय लीला भन्साळीचा पुतळा जाळुन जाहिर निषेध नोंदवला. 
        या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आ.श्री संभाजीराव भिडे गुरुजी असं म्हणाले, " राजपुत माता भगिनींनी तीन वेळ जोहार केलाय त्या जोहारातील जी आग आहे ती आग यांना देशात शिल्लक ठेवणार नाहि त्यासाठि यांना पुनर्जन्मा ची वाट चोखाळावी लागेल.महाराष्ट्रामध्ये हि आग भडका घेऊन उठेल संबंध देशात हि आग लावेल.आणि हे चित्रपट निर्माते देशात शिल्लक राहणार नाहित याची खात्री बाळगावी".
Share:

Related Posts:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

82253

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive